Welcome

My mission is to empower people to find inner clarity and personal happiness through simple, uplifting, motivational, and applicable articles.

जीवन का मूल्य

August 27, 2015

गुरुनानक साहेब के पास एक आदमी गया और उसने कहा बताईये गुरूजी जीवन का मूल्य क्या है?

गुरूनानक ने उसे एक पत्थर दिया और कहा,
"जा और इस पत्थर का मूल्य पता करके आ, लेकिन ध्यान रखना पत्थर को बेचना नही है I

वह आदमी पत्थर को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और संतरे वाले को दिखाया और बोला
"बता, इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले पत्थर को देख कर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा"

वह आदमी संतरे वाले से बोला गुरू ने कहा है इसे बेचना नही है

और

आगे एक सब्जी वाले के पास गया, उसे पत्थर दिखाया.
सब्जी वाले ने उस चमकीले पत्थर को देखा और कहा "एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा"

उस आदमी ने कहा, मुझे इसे बेचना नही है, मेरे गुरू ने मना किया है.

आगे एक सोना बेचने वाले सुनार के पास गया उसे पत्थर दिखाया. सुनार उस चमकीले पत्थर को देखकर बोला
 "50 लाख मे बेच दे". उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे"
उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे पत्थर दिखाया.
जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा, तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया, फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका. फिर जौहरी बोला, "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी

"सारी कायनात, सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है "

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे गुरू के पास आया और अपनी बिती घटना बताई और बोला
"अब बताओ गुरूजी मानवीय जीवन का मूल्य क्या है?

गुरूनानक बोले :
तूने पहले पत्थर को संतरे वाले को दिखाया, उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई

आगे सब्जी वाले के पास गया, उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई

आगे सुनार ने "2 करोड़" बताई l और जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया

अब ऐसे ही तेरा मानवीय मूल्य है. तू बेशक हीरा है लेकिन सामने वाला तेरा आकलन अपनी औकात अपनी जानकारी और अपनी हैसियत और मकसद से लगाएगा। घबराओ मत दुनिया में तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

Respect Yourself,

You are also Unique,

No One Can Replace You.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला.त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. तो एवढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत. गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही.


एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला.
खिशात दमडीदेखील नाही आणि फिरायला बाहेर पडतो.



त्याची नजर त्या भिका-याकडे आणि त्याच्या त्या करूण अवस्थेकडे जाते.

त्या भिक-याच्या बाजूला एक पाटी आणि दोन-तीन खडू पडलेले.

हा लेखक त्या भिक-याकडे जातो आणि म्हणतो, "मित्रा, मी एक लेखक आहे, ज्याच्याकडे एक पै देखील नाही, पण माझ्याकडे कला आहे. माझ्याकडे शब्दांची शक्ती आहे. ती मी तुला देऊ शकतो. तुझ्या परवानगीने मी या पाटीवर काही लिहू का?"

"साहेब" भिकारी म्हणतो,
"माझ्याशी कुणी बोलतदेखील नाही. मी एक गरीब आंधळा भिकारी. तुम्हाला त्या पाटीचं जे ठीक वाटतं ते करा."

तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून निघुन जातो.

त्या क्षणापासून भिका-याच्या लक्षात येते की, एकदम जाणा-या - येणा-यांपैकी प्रत्येकजण त्याच्याजवळ थांबून त्याच्यापुढ्यात पैसे टाकू लागलाय.

थोड्याच वेळात तिथे पैशाची रास जमते.

तो भिकारी बेचैन होतो.
नाण्यांची रास वाढतच जाते.

तो एवढा अस्वस्थ होतो की पैसे टाकणा-यांपैकी एकाचा हात पकडतो आणि म्हणतो, "साहेब, माफ करा तुमचा हात पकडल्याबद्दल. मी एक गरीब आंधळा भिकारी आहे. मला कृपा करुन जर या पाटीवर काय लिहीलंय ते वाचून दाखवलेत तर फार उपकार होतील हो."

तो माणूस पाटी उचलतो आणि वाचायला लागतो.

"वसंत ऋतू म्हणजे बहरलेली सृष्टी
आणि माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी."


भिका-याच्या गालावरुन अश्रू ओघळायला लागतात.

आयुष्य कुणी जास्त जाणलं?

या ओळी लिहीणा-या लेखकानं?
त्या ओळी वाचून पैसे टाकणा-या लोकांनी?
कि इतक्या वर्षांनी रडणा-या त्या भिका-यानं?

तुमचे डोळे चांगले असतील
तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...

पण जर तुमची वाणी गोड असेल
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल...

माणसाला बोलायला शिकण्यास
(किमान) २ वर्ष लागतात...

पण "काय बोलावे?"
हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते...

ओढ म्हणजे काय?
हे जीव लावल्याशिवाय कळत नाही...

प्रेम म्हणजे काय?
हे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...

विरह म्हणजे काय?
हे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...

जिंकण म्हणजे काय?
हे हरल्याशिवाय कळत नाही...

दुःख म्हणजे काय?
हे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...

सुख म्हणजे काय?
हे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

समाधान म्हणजे काय?
हे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...

मैत्री म्हणजे काय?
हे ती केल्याशिवाय कळत नाही...

आपली माणस कोण?
हे संकटांशिवाय कळत नाही...

सत्य म्हणजे काय?
हे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...

उत्तर म्हणजे काय?
हे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...

जबाबदारी म्हणजे काय?
हे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...

काळ म्हणजे काय?
हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...

✌🎭✌

मला माणसे जोडायला आवडतात,
माणसांशी नाती जोडायला आवडतात.
जोडलेली नाती जपायला आवडतात,
कारण माझा विश्वास आहे की, माझ्यानंतर मी कमावलेली संपत्ती मी बरोबर घेऊन जाणार नाही. परंतु, मी जोडलेल्या माझ्या माणसांच्या डोळ्यांतील अश्रूंचा एक थेंब हाच माझ्याकरिता लाखमोलाचा दागिना आणि हीच माझी आयुष्यातील खरी कमाई असेल...

हुशार आणि मुर्ख

August 26, 2015

एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने
एकदा चर्चा करायला त्याला बोलवले.

भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला
 " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला

हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ...तो घरी गेला. त्याने मुलाला विचारले
" बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "
" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला
" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?
म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!
माझी चार लोकात खिल्ली उडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!

मुलगा म्हणाला
"राजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो. रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहे.
मी दिसताचं राजा मला बोलावून घेतो. त्याच्या सोबत गावातील सारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातात सोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोर धरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल आणि मी चांदीचे नाणे उचलतो ..
त्यामुळे तिथे असलेले सगळे मोठ्याने हसतात ... सार्‍यांना मजा वाटते ....... असे रोज घडते

मुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही न राहून त्याने मुलाला विचारले  " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ? असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"

मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेला. कपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्या नाण्यांनी भरलेली होती.

हे पाहून विद्वान अवाकचं झाला

मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेल तर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही.
मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "

सोन्याची एक संधी साधण्या पेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!
काय वाटते ?

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे...


संस्कार

August 22, 2015


संस्कार मुलांवर करताना ते त्यांच्यावर ओरडून, त्यांना मारून करता येत नाहीत. संस्कार करायचे म्हणून करता येत नसतात तर ते आपल्या बोलण्यातून, वागण्यातून सहज आले पाहिजेत तरच ते मुलांच्यात खोलवर रुजले जातात. याचे एक सुंदर उदाहरण पहा.
एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी असेच फिरत होते. वाटेत त्यांना एक मोठे शेत लागले. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचे जुजबी समान होते आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदर अडकवला होता. सदर पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झाले आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."
बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ हा....त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेऊ या."
मुलगा म्हणाला, छे, दगडाने जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा."
पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."
मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्याने टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला माहीत होते....मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार. ते दोघेही एका झाडाच्यामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सुर्य डोक्यावर आला शेतकऱ्याने नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधले, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचे बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागले.
'कालच्यान अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई . कारभारीनबी उपाशीच . लेकराला दुध नाई . कसं व्हणार. काय बी समजना.' मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी पिला आणि फांदीवरचा सदर काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला. हाताला काही लागले म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!...दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!!. त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. 'आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकड देईन मग ती रांधून पोटभर जेवल आणि लेकरालाबी दुध पाजलं. लेकरू मग खूप खुश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझबी पोट भरल.'
मग तो नांगरलेल्या शेतात गेला वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, 'देवा, कोनाच्या रुपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येन ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, हि सारी तुजी दया...म्या आज भरून पावलो.'
हे सारे बोलणे ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होते आहे हे त्यालाच कळत नव्हते. तो त्या बाबांना म्हणाला, "बाबा,मला काय होत आहे हे मला काहीच कळत नाही. असे वाटते आहे की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे....पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उचंबळत आहेत."
बाबा म्हणाले."बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना? त्याचा आशिर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."
अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल. धाकधपटशा करून ...जसे की, तू असेच वागायला हवे, तसेच वागायला हवे....असे करून संस्कार होत नसतात. आपणच आपल्या आचरणातून, वागणुकीतून सहज ते प्रकट करायला हवेत आणि मुलांना जाणवून द्यायला हवेत त्यामुळेच ते सदैव त्यांच्या मनावर बिंबवले जातील......

खरे अध्यात्म (True Spirituality)

August 19, 2015

अध्यात्म अनुसरायचे किंवा शिकायचे म्हणजे दैनंदिन जीवनातील उपभोगाच्या सर्व वस्तूंचा , खाद्यपदार्थांचा त्याग करायचा , असे बऱ्याचजणांना वाटते. थोडक्यात , अध्यात्माची सांगड बरेचदा संन्यासाशी घातली जाते. रोजच्या जीवनात , आपल्या आचरणातच आपण अध्यात्म आणू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल आणि तो समाजाला उपयोगी पडेल.

चित्रलेखा नावाच्या अभिसारिकेची कथा सर्वश्रुत आहे. एका मोठ्या धर्मगुरूचे दोन शिष्य तिच्याकडे राहायला येतात. तिच्यासारख्या अभिसारिकेजवळ राहून पाप काय आणि पुण्य काय याचा शोध त्या दोघांनी घ्यायचा , असा धर्मगुरूंचा आदेश असतो. चित्रलेखा श्रुंगाराचे , ऐषआरामाचे आयुष्य जगत असते. परंतु मनाने अत्यंत पवित्र , निरागस असते. याउलट ज्या धर्मगुरूंनी आपल्या शिष्यांना तिच्याकडे पाठविलेले असते , ते चित्रलेखाला भेटतात , तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून त्यांचाच पाय घसरतो , मन ‌विचलित होते. शेवटी त्या शिष्यांना हे समजून चुकते की , अमका व्यवसाय केला म्हणून कोणी पापी आहे असे नाही आणि धर्मगुरू झाले म्हणून ते पुण्यवान आहेत असे नाही. पाप-पुण्य आपल्या मनात असते आणि ते आपल्या आचरणात उतरत राहते.

दुसरी कथा राजा जनकाची आहे. एकदा शुकदेव राजा जनकाकडे येतात. म्हणतात , ' तुला सगळेजण संन्यासी राजा किंवा श्रीमंत योगी असे म्हणतात. तू तर राजमहालात राहतोस. सगळी सुखे उपभोगतोस. तू कसा योगी ?' त्यावर जनक राजा शुकदेवांना विनम्रपणे म्हणतात , ' तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी थोड्या वेळानंतर देतो. तत्पूर्वी आपण माझा महाल पाहावा अशी माझी इच्छा आहे. परंतु तो पाहताना मी आपल्या हातात तेलाने भरलेला एक दिवा देणार आहे. तो घेऊन आपण महालभर फिरावे. मात्र त्या दिव्यातील एक थेंबही तेल खाली सांडू नये याची दक्षता घ्या , एवढी विनंती मी आपणांस करीत आहे. '
जनकाने सांगितल्यानुसार शुकदेव महाराज दिवा घेऊन निघाले. संपूर्ण महाल पाहून परत आले. दिव्यातील तेल जराही सांडलेले नव्हते. परत आल्यावर शुकदेव महाराज स्थानापन्न झाले. जनकाने त्यांना विचारले , ' महाराज , माझ्या महालात आपल्याला काय काय दिसले ? ऐश्वर्याच्या किती खुणा सापडल्या ?' त्यावर शुकदेव महाराज म्हणाले , ' मला तर महालात काहीच आढळले नाही ; कारण माझे लक्ष सतत दिव्यावर व त्यातून सांडणाऱ्या तेलावर होते. ' जनक हसून त्यांना म्हणाले , ' महाराज , माझेही तसेच आहे. हे ऐश्वर्य उपभोगण्याची सवडच मला नाही ; कारण जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र मला लक्ष ठेवावे लागते. ' शुकदेव महाराजांनी जनकाचे श्रीमंत योगीपण मान्य केले.
उपभोगाची लालसा मनी ठेवून धनदौलत गोळा करणे , कपड्यालत्त्यांवर वारेमाप खर्च करणे , हे अध्यात्माचे लक्षण नाही. आपल्याकडे ऐश्वर्य असल्यास त्याचा उपभोग घेणे चुकीचे नाही ; मात्र आपल्या समृद्धीचा , ऐश्वर्याचा उपभोग घेता घेता आपली कर्तव्ये पार पाडणे आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल , तेव्हा दुसऱ्यांना मदत करणे हेच खरे अध्यात्म होय. 


स्त्रोत- नीला सत्यनारायण (महाराष्ट्र टाइम्स)

Hammer

August 8, 2015


A giant ship engine failed.

The ship's owners tried one expert after another, but none of them could figure but how to fix the engine. 



Then they brought in an old man who had been fixing ships since he was a young.

He carried a large bag of tools with him, and when he arrived, he immediately went to work.

He inspected the engine very carefully, top to bottom.

Two of the ship's owners were there, watching this man,
hoping he would know what to do.


After looking things over, the old man reached into his bag and pulled out a small hammer.

He gently tapped something.

 

Instantly, the engine lurched into life.
He carefully put his hammer away.

The engine was fixed! 


A week later, the owners received a bill from the old man for
Rs.100,000.

"What?!" the owners exclaimed.
 "He hardly did anything!"

So they wrote the old man a note saying, "Please send us an itemized bill."

The man sent a bill that read:

Tapping with a hammer..  . Rs. 2/-

Knowing where to tap...       Rs 99,998/-

Moral of the story:

Effort is important, but knowing where to make an effort in your life, makes all the difference.

"Life doesn't change in ONE MINUTE, but taking decision after thinking for ONE MINUTE  can change life."